Subscribe Us

Header Ads

ना.नितीन गडकरींच्याच्या हस्ते झाले बहुचर्चित उड्डाणपुलाचे लोकार्पण, खा. विखेंसह राष्ट्रवादीच्या आ.संग्राम जगतापांचेही केले कौतुक, खड्ड्यांच्या प्रश्नावरून सामान्य नगरकरांच्या तोंडाला पाने पुसल्याची काँग्रेसच्या किरण काळे यांची टीका

ना.नितीन गडकरींच्याच्या हस्ते झाले बहुचर्चित उड्डाणपुलाचे लोकार्पण, खा. विखेंसह राष्ट्रवादीच्या आ.संग्राम जगतापांचेही केले कौतुक

खड्ड्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे, दोन उड्डाणपुलांच्या मागणीकडे गडकरींनी कानाडोळा करत नगरकरांच्या तोंडाला पाने पुसली - काँग्रेसच्या किरण काळेंनी साधला निशाणा  

अ-नगर प्राईड न्यूज टीम : अखेर बहुचर्चित नगर शहरातील पहिल्या वहिल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील होते. यावेळी शहरासह जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने शिल्पा गार्डन येथे झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. दिवंगत खासदार दिलीप गांधी यांच्या योगदानाबद्दल यावेळी गडकरींनी आभार मानले. गांधी यांच्यानंतर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळेच हे काम पूर्ण झाल्याचे ते म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.संग्राम जगताप यांचे देखील यावेळी गडकरींनी यांनी विशेष कौतुक केले. आता उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला झाला आहे. रात्री पुलावर लेझर शोचे आयोजन करण्यात आले असून याची उत्सुकता नगरकरांना लागली आहे. 

दरम्यान, गडकरी यांना शहर खड्डे दर्शन यात्रेचे निमंत्रण काँग्रेसच्या वतीने देण्यात आले होते. तसेच कल्याण रोडवरील शिवाजीनगर ते नेप्ती नाका चौक आणि न्यू आर्ट्स कॉलेज ते सक्कर चौक अशा नगर शहारातील स्थानिक नागरिकांसाठी दोन उड्डाणपुलांची मागणी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी गडकरी यांच्याकडे केली होती. नगर शहरातील अंतर्गत रस्त्यांबाबत आणि खड्ड्यांच्या प्रश्नाबाबत ना. गडकरींनी ब्र सुद्धा काढला नाही. कल्याण रोडवरील नदीवरील पुलाची तातडीची गरज असताना त्याबाबत कोणतेही आश्वासन त्यांनी दिले नाही. न्यू आर्टस् कॉलेज ते सक्कर चौक उड्डाणपूल मागणी बाबतही त्यांनी नगरकरांना कोणताही दिलासा दिला नाही. नगरकरांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचे काम गडकरींनी केले, अशी खंत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यक्त केली आहे. 

काळे म्हणाले की, ज्या रस्त्यांनी गडकरी यांनी शहरातून प्रवास केला त्या ठिकाणी लगबगीने रस्त्यांची कामे, डागडुजी केली गेली. त्यांनी शहर खड्डे दर्शन यात्रा केली असती तर सामान्य नगरकरांच्या दैनंदिन आयुष्यातील दुःख त्यांना समजले असते. ते देशाचे रस्ते वाहतूक मंत्री आहेत. देशासह राज्यात देखील त्यांच्याच पक्षाचे सरकार आहे. ते स्वतःही नगर शहराच्या अंतर्गत रस्त्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करू शकले असते. तसेच राज्यातील त्यांच्या पक्षाच्या सरकारला देखील याबाबत सूचना करू शकले असते. मात्र त्यांनी यापैकी काही एक केले नाही. 

शहराचे आमदार, दक्षिण नगरचे खासदार यांनी सुद्धा याबाबत कोणताही आग्रह धरला नाही. ज्यांनी उड्डाणपूलाच्या कामाला विरोध केला, त्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आमदारांचे कौतुक केंद्रीय मंत्री असणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी केले. मात्र नगरकरांमध्ये आजही लोकप्रीय असणाऱ्या आमच्या अनिलभैय्या राठोड यांच्या नावाचा नितीन गडकरी यांनी साधा उल्लेख ही केला नाही. ही नगरकरांना वेदना देणारी बाब असल्याची खंत काळे यांनी व्यक्त केली आहे. 

Post a Comment

0 Comments