Subscribe Us

Header Ads

शिवसेनेचे दोन गट पडण्यामागे भाजपचंच मिशन होतं - मंत्री गिरीश महाजन

 

अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : शिवसेनेचे दोन गट पडण्यामागे भाजपचंच मिशन होतं. हे गुपित मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावातीव एका सभेत बोलताना सांगून टाकलं. महत्त्वाची बाब म्हणजे, या सभेला मंत्री गिरीश महाजनांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गुलाबराव पाटीलही उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे अखिल भारतीय बडगुजर समाजाचं महाधिवेशन पार पडलं. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना मंत्री गिरीश महाजन बोलत होते. त्याचवेळी त्यांनी शिवसेनेत फूट पाडण्याचा भाजपचाच डाव असल्याची कबुली दिली आहे.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “एकनाथ शिंदे कसे मुख्यमंत्री झाले. या गोष्टीचा विचार केला तर आम्हालाही विश्वास बसत नव्हता. मात्र ऑपरेशन सुरू केलं. एकनाथजी पुढे निघाले. ते पुढे गेले आणि बघता बघता त्यांचं सर्व सैन्य त्यांच्या मागे गेलं आणि शेवटी जमलंच. सारं जुळून आलं. घडून आलं, हे सांगत यामागे चामुंडा मातेचाही आशीर्वाद होताच.”

“हे सर्व मिशन एवढं सोपं नव्हतं. शिवसेनेसारख्या पक्षातून 40 लोक बाहेर पडतात, उद्धव ठाकरे यांना कंटाळून ते बाहेर पडतात. सतरा अठरा लोक घेऊन बाहेर पडायचं आणि पन्नासपर्यंत मजल गाठायची, हे खूप अवघड होतं. मध्येच मिशन फेल झालं तर काय करायचं? असं वाटायचं. 

मात्र पुढारी कसे असतात, तुम्हाला माहिती आहे. आम्ही कसे असतो, तुम्हाला माहिती आहे.”, असं गिरीश महाजन म्हणाले. हे म्हणताच उपस्थितांमध्ये एकाच हशा पिकला. मात्र लोक आले आणि एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभी राहिले, त्यामुळे अनेकांचे आशीर्वाद, प्रार्थना या एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी होत्या.

Post a Comment

0 Comments