Subscribe Us

Header Ads

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार उज्वल भवितव्यासाठी दिशादर्शक : किरण काळे... अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी

अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांचे विचार आजही समाजाला एकविसाव्या शतकात देखील तेवढेच प्रेरणादायी आहेत. आजच्या तरुण पिढीला आणि समाजाला उज्वल भवितव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे दिशादर्शक असल्याचे, प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. 

शिवजयंती निमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच पक्षाच्या सर्व फ्रंटलच्या वतीने छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला चितळे रोड येथील "शिवेनरी" या पक्ष कार्यालयात शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. त्यावेळी काळे बोलत होते. यावेळी जय भवानी, जय शिवाजीच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.

यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रविण गीते, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, ब्लॉक काँग्रेस महिला अध्यक्ष पूनमताई वन्नम, सांस्कृतिक काँग्रेस विभाग शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, शहर जिल्हा महासचिव इमरान बागवान, ब्लॉक सचिव हनीफ मोहम्मद जहागीरदार, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, साफसफाई काँग्रेस विभाग शहर संघटक प्रशांत जाधव, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष आकाश आल्हाट गौरव घोरपडे, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, युवक काँग्रेस सरचिटणीस विनोद दिवटे, केडगाव काँग्रेसचे राहुल सावंत, विद्यार्थी काँग्रेसचे वरिष्ठ शहर जिल्हा उपाध्यक्ष किशोर कांबळे, बालाजी जवंजाळ, सईद खान आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी बोलताना काळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील सर्व जाती धर्माच्या समाज घटकांना एका समान धाग्यात गुंफण्याच काम केलं. रयतेसाठी कल्याणकारी स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांचे हेच विचार समाजाला आजही प्रेरणादायी असून तरुण पिढीने या विचारांचे अनुकरण मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे. 

नगर शहरामध्ये काँग्रेस कार्यकर्ते काम करत असताना महाराजांच्या लोकांच्या सेवेच्या कामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करत असतात. हे काम करताना सर्व समाज घटकांना बरोबर घेत काम करण्याची भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांची नेहमी असते, असे यावेळी काळे म्हणाले.


Post a Comment

0 Comments